Pages

Sunday, 27 June 2021

मृग नक्षत्र

 


अमर व्याध हा अमर हरिण तो मृगयेचा सोहळा
अजरामर हो दिगंतरातुन हा मुलुखावेगळा!

उरात रुतला बाण परंतु खंत मृगाला नसे
प्रकाश उधळित नील पथाने संथ पुढे जातसे!

तीर सोडूनी एक राहिला मुग्ध उभा पारधी
वाट पहातो हरिण, यायचा शर दुसरा तो कधी?

अमित युगांचे कण ओघळती मृगया नच हो पुरी
परस्परांच्या सौंदर्याचे दास्य जडे अंतरी!

विचित्र या मृगयेत शिकारी एकच शर सोडूनी
मृगामागुनी अगतिक हिंडे विद्ध स्वतः होऊनी!

-कुसुमाग्रज

Friday, 10 January 2020

बचेंगे तो और भी लड़ेंगे

10 Jan 1760 is the Hautatmya diwas of Dattaji Shinde. In a pitched battle against the combined forces of the invading forces of Ahmed Shah and the "local anarchist" Najib Khan Rohilla, Dattaji fell at the battle of Buradi Ghat. Sometimes, I wonder, if later historians while studying our history, came up with a popular marathi phrase of "satarashe sath(chi) vighna.(seventeen sixty hardships)" based on the happenings, events movements between this date and the culmination on 14th Jan 1761. The lead up to Panipat was full of difficulties which could have led to the popularization of the phrase, along with "Sankrant Kosalane" for the disaster that struck on the fateful day. If not, we should make it a point to remember it as such, considering the terrible price we had to pay a year later.

Let us also never forget Najib Khan Rohilla- the person who killed Dattaji. A recurring blot of a character throughout Indian history he was a catalyst for the third battle of Panipat. It is essential that we identify these modern Najibs and unmask them before they unleash any more cross border Abdalis on us. We can see them peeping up from various campuses all over the country.

Prabhu Ramchandra gave us Hindus a very wise teaching which reads मरणान्तानि वैराणि निर्वृत्तं नः प्रयोजनम्।[Enmity ends with death; it is of no use to desist] This was always respected, with the notable exception being Najib. Maratha armies, under the command of Visaji Pant Biniwale and Mahadji Shinde later in 1771 defeated his son Zabita Khan, captured Patthargadh and gave Najib his much needed Azadi from a claustrophobic tomb.

These Najibs should never be forgotten as they are entrenched in our society - scheming to find schisms in your ranks and exploit it for their own selfish motives and benefits. 

Neither should we ever forget our history and our mistakes. We had our share of Satarashesath Vighna - the reasons for which are well established. No more should they repeat. Panipat 3 could have been won, maybe should have been won. Panipat 4 is in the making, and if we are to win, reflecting on our history is a must.

Keeping in mind the possibility of the inevitable and the generosity of the bridge building Najibs of today for wholesale mass reporting and stifling a differing opinion than their own, we will remember the warrior Dattaji with his famous last words to carry us through any darkness that may befall and give us the strength to fight - "बचेंगे तो और भी लड़ेंगे."


||हर हर महादेव||

Saturday, 27 April 2019

रालेमधली अनोखी उबरस्वारी


परवा कॅलिफोर्निया वरून रालेला परत आलो, तेव्हा विमानतळापासून घरी यायला उबर केली होती. उबरचा ड्रायव्हर आफ्रिकन-अमेरिकन होता. आत्तापर्यंत जेव्हाकेव्हा उबर वापरली आहे, तेव्हा आफ्रिकन-अमेरिकन ड्रायव्हर असला की गप्पा मारायला धमाल येते असा माझा अनुभव आहे. अनेक विषयांवर हे लोक खूप सहज आणि मोकळेपणाने बोलतात. अनेकदा खूप कमी शब्दात किंवा काहीच न  बोलता आयुष्यातले कटू प्रसंग, सलणाऱ्या भावना आणि उघड जरी नसला, तरी गौप्य पद्धतीने चालणारा वर्णभेद यावर काहीतरी खोल बोलून जातात, नकळत व्यक्त होऊन जातात.

सहसा हवा, अमेरिकेत कधी आलात, त्यांचा आणि माझा मूळ गावं/देश याबद्दल बोलण्याने संवाद सुरु होतो. बरेच लोक तितक्यावरच थांबतात, पण नकळत गौरवर्णीय विरुध्द कृष्णवर्णीय यांतला नकळत होणारा फरक चटकन सांगून जातात. पण बरेच लोक मोकळेपणाने बोलतात. आफ्रिकेतल्या सुदान, सोमालिया, किंवा इतर युद्धग्रस्त देशातून पलायन करून आलेले अनेक लोक इथे उबर ड्रायव्हरचं काम करताना दिसले आहेत. आपल्या देशी परत जाऊ शकत नाही याची त्यांना प्रचंड खंत असते आणि ते दुःख अनेकदा दिसून येतं. पण यातल्या अनेकांना भारताबद्दल जबरदस्त कुतूहल आहे. त्यांचे अनेक मित्र दिल्ली विद्यापीठातून शिकले आहेत. मुंबई आणि पुणे विद्यापीठे देखील यांना माहिती असतात. माझ्यासाठी इथे आल्यावर हे सगळं ऐकणं जरा नवीनच होतं.

परवाचा माझा झालेला मित्र, “गाम्बिया” नावाच्या अतिशय छोट्या देशातून आला होता. पश्चिम आफ्रिकेतील सेनेगाल नावाच्या देशाच्या मधोमध एका नदीचं खोरं आहे, आणि या नदीच्या लागतची एक छोटीशी पट्टी म्हणजे हा गाम्बिया देश. पूर्ण पश्चिम आफ्रिका फ्रेंचांनी गिळंकृत केले असताना या नदीच्या खोर्यात इंग्रज शिरले होते. नकाशावर हा देश बघितला होता, पण फारशी माहिती नव्हती. माझ्या या नव्या मित्रामुळे तीही भरपूर मिळाली.

सहज बोलता बोलता जगात कुठे काय सुरु आहे यावर विषय घसरला. पाश्चात्य देशांनी सत्ता केंद्रित करण्यासाठी जगात “गरज नसताना कशी युद्ध केली” यावर विषय गेला होता. सिरीया, इराक, विएतनाम, कोरिया, किम जोंग उन, ट्रम्प, अफगाणिस्तान, कोल्ड वॉर, आणि अशा कितीतरी विषयांवर गप्पा झाल्या.यावर काही महानेत्यांच्या पोकळ विचारांचे धिंडवडे काढले गेले. त्यातच एक कमालीचं वाक्य ऐकायला मिळालं.. “Some countries think that they spread non violence. But they are the most violent countries in the world- involved in most unnecessary wars. If anyone asks them why, the response is “Our violence is to uphold non-violence” and that is complete BS”. खरोखर विचार करण्यासारखा मुद्दा आहे हा. पुढे गप्पा मारता मारता लोकशाहीची गरज नसताना केलेली अंमलबजावणी, फसलेली लोकशाही आणि काही ठिकाणी हुकुमशाही का योग्य होती हे संभाषण पण झाले. तेव्हा “Let me tell you- If people are ruled by an idiot they don’t want, it is called dictatorship. But if they are ruled by and idiot they elect, its called democracy” असे नवे ज्ञान मला मिळाले. 

एखाद्या उबर ड्रायव्हर बरोबर मी या गप्पा मरीन याचा मी स्वप्नात देखील विचार केला नव्हता.
पुढे सोशल मिडिया, केम्ब्रिज अनालीटीका, निवडणुकी, याकडे विषय वळला हे स्वाभाविकच होतं. “How is our friend Mr. Modi doing? You think he will get elected again?” हा प्रश्न ऐकून मी ५ मिनिट सुन्न झालो होतो. अमेरिकेतल्या तशा छोट्याशा शहरात गाम्बिया नामक चिमुकल्या देशातून आलेला एक माणूस इतक्या उत्साहाने भारतीय निवडणुकीकडे लक्ष ठेऊन आहे, यावर विश्वास बसत नव्हता. पुढची १० मिनिटे मोदिनी किती भारी काम केलं आहे, हे मी त्याच्याकडून ऐकलं, आणि “If I was Indian, I would always vote for him” हे विधान ऐकून थक्क झालो. मी मोदी समर्थक आहे- विचारधारेमुळे, संघाच्या संस्कारामुळे, भाजपबद्दल आपसूक असणाऱ्या आकर्षणामुळे मी, किंवा माझ्यासारख्या इतर कोणी हे विधान करणे अगदी स्वाभाविक आहे. पण, परत, आफ्रिकेतल्या छोट्याशा देशातला तो माणूस, भारतात असलेल्या त्याच्या मित्रांच्या बोलण्यावरून, भारतात एकूणच इंटरेस्ट घेऊन निस्वार्थ मानाने हे म्हणतो हे खरोखर विशेष आहे. “Sometime I wish our African countries had a leader like Modi – we would have been so much ahead of where we are now” या वाक्याने तर मी अक्षरशः बधीर झालो होतो.

आपल्याकडे आज एक राष्ट्रपुरुष, विश्वपुरुष उभा करण्याची संधी आहे. भारतातच नव्हे, तर इतर अनेक देशात मोदींचे भारतीयइतर चाहते आहेत, ही कल्पनेपलीकडची गोष्ट आहे. आपण फक्त एक सक्षम पंतप्रधान नाही तर कदाचित एक विश्वमार्गदर्शक बघतो आहोत. भारतातच नाही, तर इतर अनेक देशात मोदी यांच्याकडे लोक आशेने बघन आहेत, यात काही शंका नाही. एक भारतीय आणि त्यातून मोदी समर्थक म्हणून आपल्याला अजून किती काम शिल्लक आहे, त्याचा आवाका काय आहे, ते डोळ्यासमोर उभं राहिलं.

विमानतळावरुन घरी यायला पाउण तास लागला, आणि या सर्व गप्पांच्या नादात तो कसा गेला तेच कळलं नाही. पुढचे दोन दिवस यावरच विचार सुरु होता. अमेरिकेत येताना तिथल्या लोकांबद्दल- विशेषतः आफ्रिकन अमेरिकन लोकांबद्दल मनात काही स्टीरियोटाईप आणि पूर्वग्रह करून आलो होतो- ते आत्तापर्यंत बऱ्याच प्रमाणात ढासळले होते- पण त्या “सामान्य टॅक्सी चालकाबरोबर” झालेल्या बोलण्यानंतर तर ते पूर्णतः कोसळले आहेत. या देशात खरोखर हिरे विखुरले आहेत.

Saturday, 19 January 2019

Why the Mughals could never really capture the Deccan.

I had written this as one of my Facebook posts a few years back. Today, on the insistence of my photographer par excellence friend Kapil, I'm sharing this write-up as a blog post. I have independently written a more detailed answer on Quora which can be accessed here[1]. Additionally, I have written on the importance of forts, and their role in the 27 Year war of  independence, which can be found here[2].

This article, and the articles on the two links I shared are my humble offerings to Shri Ninadrao Bedekar, the person who painted in great detail the life, times, policies, and a new perspective on Shivaji,the Marathas, and the indomitable spirit of the Sahyadris. In memory of the great historian who enthralled and inspired so many of us.




Why Aurangzeb could never quite capture the Deccan despite possessing the worlds biggest and best equipped army of the time, was mainly due to the underestimation of both- the terrain here as well as the brilliant tactics of Marathas. Even though he did not wholeheartedly support it, Aurangzeb had to split his army in two and open two fronts- one in the Deccan where he attempted to capture important and strategic forts such as Raigad, Panhala, Rajgad, Vishalgad, Sinvhagad, Torna, Satara, Sajjangad(Parali) whereas the second division of his army, under the command of the brilliant general Zulfikar Khan was sent south to capture Jinji, which was now the capital of Marathas. Rajaram Maharaj had successfully evaded the Mughal forces first at Raigad then Panhala, Vishalgad and had finally reached Jinji, from where he fought Zulfikar Khan for 7 years. This was a huge stretch to the Mughal Supply lines, and brilliant Maratha generals such as Santaji Ghorpade and Dhanaji Jadhav ruthlessly cut off these already stretched lines. The movement of these two were so lightening that it was impossible to predict where they would turn up. 


Jinji burnt a huge unsustainable hole in the Mughal treasury and did its job. In Maharashtra he managed to reduce the tactically important forts mentioned above, but needed months of siege. Once the marathas thought that their positions on these forts (all of which rise atleast 1000-2000 feet from surrounding areas and are extremely difficult to climb) was untenable-if they were out of food or ammunition, they would take money from the mughals and surrender the fort- but applied a scorched earth policy wherein all food and ammunition was burnt. When the Mughals received the empty fort, they used to stack it up with grain and ammunition and do whatever repairs were needed to strengthen it. Once all this was done, the Marathas would surprize attack the forts and retake it without much losses. In the end, they ended up retaining the fort in a better position than which they had left it in. This "business" continued for 27 years and Mughals went bankrupt.
The other decisive factor was the full manipulation of the season. Winter was usually the time for war and campaigns and generally these campaigns lasted till the summer. Marathas held on to their positions till the rains arrived and opened negotiations with the Mughals once it started raining. Most of the important forts overlook a river valley, and as such, any besieging Mughal force was camped along the banks of these rivers- which were prone to flash flooding. As soon as it started raining heavily enough, Marathas opened talks so that Mughals would have to shift their bases to these valleys, and as a result, were prone to the attacks by the natural elements. The story of Urmodi river devastating the mughal camp at the foothills of Sajjangad is quite famous.


The legacy of Shivaji Maharaj had lived on through to the Marathas. In a bakhar, there is a quote attributed to Ch.Shivaji, which roughly translates as: "Today, we control 350 forts. One day will come when Alamgir(Aurangzeb) will come to deccan. I will fight each of my fort for atleast a year against him. That Alamgir will need a lifetime of 350 years to capture deccan." When Aurangzeb finally came to deccan in 1682, he started his war by capturing a small hillfort called Ramsej near Nasik. An army of 50,000 was sent to reduce the fort under the command of a high ranking official- Shahbuddin Khan Gaziuddin Firoz Jung. Ramsej is a small fort which can hold not more than 500 people. We dont know who was incharge of the fort. But this anonymous killedar not only defended the fort- he with his 500 men defended it for five and a half years. How was the Alamgir then supposed to win the deccan in his lifetime?

Finally the most important factor was an unseen one. Mughals possessed the finest generals of the time- Zulfikar Khan, Ikhlas Khan, Mukarrab Khan, Feroze Jung etc. Marathas had Santaji, Dhanaji, Ramchandrapant, Shankarji Narayan, etc. but they also had the invisible General Sahyadri on their side. The above mentioned Maratha generals enlisted the help of General Sahyadri in each and every campaign and he assisted them everytime, thereby creating a havoc in mughal camps. If it is said that the Russian General Winter defeated Napoleon and Hitler, then most definitely General Sahyadri not only defeated Aurangzeb, but decimated his forces, and crumbled his empire.

Some photos of General Sahyadri- the heartland of Maratha country.


A cluster map of the Forts in Sahyadri- Maharashtra and Goa only.

View From Amba Ghat, Sakharpa to Ratnagiri



Vishalgad




Around Raigad-1

Around Raigad-2

Tung

Sinvhagad Valley.

Pratapgad on the right to Makarandgad on left

Makarandgad

Kailasgad, Mulshi

Towards Kothaligad

Rajgad

Rajgad

Rajmachi

Others will be updated as and when I edit them!

[1] https://www.quora.com/How-did-Marathas-defeat-The-Mughals/answer/Chinmay-Datar-6
[2]https://www.quora.com/What-was-so-significant-about-forts-during-the-Maratha-and-the-Mughal-Empires/answer/Chinmay-Datar-6

Monday, 12 November 2018

विचित्र हावभाव ऑफ सोशल मिडिया


सोशल मिडियावर गेले काही दिवसात सुंदर नेत्रसुखद मुलींच्या फोटोंचा(दिवाळी निमित्त) फार जास्त सुळसुळाट झाला होता. बाकी काही असो, हे फोटो काढणारे फोटोग्राफर्स खरोखर महान कलावंत आहेत. भारतात जसजसे हे कॅमेराधारी वाढत आहेत, त्याच प्रमाणात  प्रत्येक कॅमेराधाऱ्याकरवी किमान ७-८ मुलींचे फोटो-सेशन होतातच. हजारोंच्या संख्येने फोटोग्राफर्स आणि दहाहजारांच्या संख्येने त्यांचे मॉडेल्स झाले असले, तरी या दशसहस्र मॉडेल्सच्या मात्र, दुर्दैवाने काही ठराविक १५-२० पोज सोशल मिडीयावर बघायला मिळतात(या मॉडेल्सच्या प्रोफाईली म्हणजे सोशल मिडिया-सोसल पब्लिक अशाच शब्दात मांडाव्या लागतात... असो...). साथप्रसिद्धी (virality)  मिळायला  या जगावेगळ्या आणि विचित्र हवभावांमध्ये नक्की काय ठेवलं आहे, ते मला मात्र आजतागायत कळलं नाहीये. या हावभावांना नक्की म्हणायचं तरी काय असा प्रश्न कायम पडतो. 

गेल्या काही दिवसात तर instagram नावाच्या सुंदर चेहऱ्यांचे विहंगम दृश्य दाखवणाऱ्या app मुळे डोकं फिरायची वेळ आली आहे. एरवी वाट्टेल ते कपडे घालून स्वतःची टिमकी मिरवणाऱ्या खुळबुळजनक प्रोफाईलींमध्ये ऐन दिवाळीत साड्यांचा धो धो पाऊस पडला.  खरं तर डोळ्यांना बरं वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती म्हणायची वेळ आली होती.चांगले फोटो बघण्याची अपेक्षा वाढली होती.... पण... दुष्काळात १३वा महिना येऊन जसा छळतो , त्याच तीव्रतेने insta ने अपेक्षेला तडा दिलाच... भरजरी साडी नेसून चांगले हावभाव न देता त्याच विचित्र हावभावांचा महापूर आला होता. आविर्भावाच्या महापुरात सापडलेला माणूस शाब्दिक गटांगळ्या खाण स्वाभाविक आहे, म्हणून अशा पूरग्रस्तांना मदत म्हणून आम्ही प्रचलित भाववक्तव्याचे विशेषणयुक्त वर्गीकरण प्रात्यक्षिकासह(पिडा सहन करा) पुढे सादर करत आहोत..
  
प्रत्येक मुलगी या वर्गीकरणात बसेलच असे नाही. बहुतांश मुली सेन्सिबल असतात आणि असल्या आचरटपणा पासून दूरही राहतात- त्यामुळे कशातच बसत नाहीत. त्यांना या ब्लोगमध्ये अजिबात टार्गेट करत नाहीये. खाली दिलेली यादी देखील सर्वव्यापी नाही. बऱ्याच मुली यातील दोन किंवा अधिक भाव एकत्रही करतात. काही मुली Gaussian Outliers असतात, आणि या यादीपलीकडले हावभाव व्यक्त करतात. तरी, बहुतांश जणी(आणि काही जण) पुढील वर्गांमध्ये बसतातच.

१. चंबूमुखी: सोशल मिडियावर सगळ्यात खळबळजनक आणि प्रचलित अशी ही पोज. आपल्या ओठांचा विचित्र असा काहीतरी चंबू करून बदकासारखं तोंड करत, गाल आत ओढून खोट्या खळ्या पाडण्याचा फालतू प्रयत्न करून फोटो काढणाऱ्या मुली या "चंबूमुखी" वर्गात गणल्या जातात. मला अनेकदा वाटतं की अशी तोंडं केली की त्यासमोर बेडूक ठेवावा. कोण जाणे, एखाद्या शापित बेडकाचा या चंबूमुखीमुळे भाग्योदय व्हायचा...


२. त्रस्तललाटी: या गटात मोडणाऱ्या मुली कायम चेहऱ्यावर एक त्रस्त भावना ठेऊन फोटो काढतात. “दामू नेन्या” सारख्या यांच्या कपाळावर पण कायम आठ्या असतात. ढगळ कपडे घालून भल्या मोठ्या कॉफीच्या कप मागे अर्धा चेहरा लपवून त्रस्तललाटी होण्यात यांना काय धन्यता वाटते काय माहित!. यांच्या फोटोकडे बघून शेवटी आपल्यालाच वैताग येतो. देवाने सुंदर चेहरा असे फालतू भाव दाखवायला दिला नाहीये असं ओरडून सांगावसं वाटतं यांना.   

३. वक्रभिवई: शायनिंग मारणाऱ्या काही मुली असतात त्यांची ही खासियत आहे. उगीचच एक भिवई वर घ्यायची आणि दुसरा डोळा छोटा करून एकाक्ष नजरेने जगाकडे बघायचं. माणसाला सतत आश्चर्य वाटलं किंवा सतत संशय आल्यावर त्याच्या चेहऱ्यावर एक भिवई सेफ्टीपिन ने कपाळात अडकवून ठेवले आहे असा काहीतरी भास होतो. फुटबॉलमध्ये कार्लो अंचेलोत्ती चा चेहरा निसर्गतःच असा आहे, त्यामुळे तो मिश्कील वाटतो. पण त्याची कॉपी करणाऱ्या मुली मांजर जसं झोपता झोपता एका डोळ्याने जग बघतं, तशा काहीशा दिसतात. पण मांजरी निदान असे डोळे करून कान टवकारून बसल्या की गोड तरी दिसतात. असो..


४. ऊर्ध्वनयन अधरांगुली: या वर्गातल्या मुली कायम तंद्री लाऊन वर बघत असतात. कायम. वर. भर दिवसा आकाशातले तारे मोजत असतात आणि त्यांचा हा दिवसाढवळ्या सप्तर्षी बघण्याचा वेडेपणा सांगणाऱ्याला करायला ओठावर बोट ठेवतात.(सुदैवाने स्वतःच्या). मला अजून खात्री पटली नाहीये की नक्की हाच विचार असतो, का कोणतातरी जागतिक प्रश्न सोडवण्यासाठी आपण गहन विचार करत तंद्रीत आहोत असं दाखवायचा खटाटोप असतो. पण, त्यांच्या दुर्दैवाने त्या साक्षात मंद वाटतात. कारण काहीही असो- आम्ही किती हुशार, माझे डोळे किती छान कोणताही विचार करून फोटो काढला तरी, बरेच वेळा चष्म्याची जाहिरात करत आहेत असंच वाटतं. तुमचं माहित नाही, पण अशा मुली बघितल्या की त्यांच्या डोळ्यात लेझर मारावासा वाटतो- तो १० रुपयांचा कुत्र्या मांजराना वेड लावणारा...अगदी डोळ्यासमोर तरळलं हे दृश्य!


५. चंबुंगली: “तू गप्प बस/आय अॅम द बेस्ट” पोज. ओठांचा चंबू करून त्याच्यावर बोट.  हे फोटो बघून तर साक्षात हिज हायनेस श्री श्री षट्बिस्कीटी ख्रिस्तियानो रोनाल्डो देखील लाजेल. या पुढे काय बोलावं आपण?

६. एधितनेत्रा: उगीचच डोळे मोठ्ठे करून बघायचं. जितके डोळे वटारता येतात, तेव्हड्या तुम्ही ग्रेट. काय सांगू आता...घुबडाचे डोळे यांच्यापुढे लहान असतात... नाही, म्हणजे कधी कधी मुली बर्यापण दिसतात यात...पण... बंगाली मुलीं एधीतनेत्रा झाल्या की कमालीचं भ्यायला होतं. आत्ता मोठ्ठे डोळे करून बघतायत, काय माहिती काही क्षणात “आमी मोंजोलिका” करत अंगावर धावून यायच्या. लांबच राहिलेलं बरं...अजून एक... इनामदाराचं "डोळे बघ डोळे" ते पण आठवतं...


७. वक्रकटी हस्तकटिका: या गटातल्या मुलींना आयुष्यात सरळ उभं राहता येत नाही. NCC नापास. १०० टक्के. सावधान सांगितलं की नक्की प्रोब्लेम येत असणार यांना. काय ते विचित्र उभं राहणं, कुल्ले काय बाहेर काढायचे, कंबरच एका बाजूनी बाहेर काढायची.. आणि हात कंबरेवर ठेवायचे.. काय कौतुक आहे या पोज च कळतच नाही. हा-हातात पाण्याचा घडा असता ही पोज तर समजू शकतो, पण इथे तर काहीच नसतं. या मुली बहुदा तीन ठिकाणी वाकडा असणाऱ्या इष्टुर फाकड्याच्या घराण्यातल्या असाव्यात.  

८. आदंशति: या वर्गातल्या मुलींना (सुदैवाने) स्वतःचे ओठ चावण्यात धन्यता वाटते. वास्तविकता यांचे दात कुबड्याखवीस आणि तात्याविंचूच्या कवळ्यांचा साचा सुवर्णलक्ष ठेवून बनवले आहेत की काय असंच वाटतं. ओठ काय चावायचेत फोतोंमध्ये? ओठ नाही चावले तर नख किंवा बोट चावतात. आणि सगळ्यात कहर म्हणजे नाडी. दामले मास्तरांच्या वर्गातली नाडी खाणाऱ्या पोराची बहिण असणार ही आदंशति. बाप उपाशी ठेवत असणार. 
दिसलं काही की चावलं त्याला... तुम्ही काय लुईझ स्वारेझ आहात का? काहीही करायचं!  


९. अर्धानासिका कृष्णोपनेत्रा: या स्वतःला लेडीज जेम्स बॉंड समजतात. आपण गॉगल घातल्यावर जरा बरे दिसतो हे त्यांना माहिती असत, आणि त्यावर हवा करायला तो गॉगल तर्जनीने नाकावर अर्ध्यापर्यंत खाली आणून बेक्कार खुन्नस देतात. यांना मी घाबरून असतो. त्यामुळे जास्त बोलणार नाही.

. अधरचुश्चुषा: ओठांना गांधीरमाशी चावल्यावर ओठ सुजल्यावर जे होईल तसं काहीसं करून त्यावर लाल भडक लिपस्टिकचा थर लाऊन याचं स्वपाप्या देणं आणि घेणं सुरु असत. यांचा पसार सर्वत्र असतो. स्टिल फोटो, gif,boomerang, ग्रुप फोटो, वगैरे काहीही असो. ग्रुप फोटो असला की तर अस्वलांच्या टोळीने मधमाशांच पोळं पडल्याचाच भास होतो.  च्विंगम वरचे ओठ पण एवढे मोठे नसतात. असो..   

(फोटो उपलब्ध नाही)

१२. द्विशर्याश्मीलिता: या वर्गातल्या पोरी भारी असतात. प्रत्येक फोटोत उभ्या आडव्या “V” च्या खुणा करतात. त्याचा (अन)अर्थ मला अजून कळलेला नाहीये. V च्या जोडीला प्रत्येक फोटोत डोळा मारतात. खऱ्या आयुष्यात एखाद्या पोरीने असे डोळे मारले ना, तर माणूस आयुष्यातून उठेल... यांना आयुष्यात योयो हन्निसिंह चालवलाय की काय अशी भीती वाटते. नाही, कारण खरच तसं काही असलं, तर वेळेत इंजेक्शन घेतलेली बरी.. सेल्फी मैने ले ली आज हे आपलं ब्रीदवाक्य करून या वर्गातल्या पोरी हा संसर्गजन्य हावभाव सगळीकडे पसरवतात.

१३. प्लवबटीका: या मुलींचे प्रत्येक फोटो मध्ये केस किंवा केसांची बट हवेत उडताना आपल्याला दिसते. “उडे जब जब जुल्फे तेरी.. कवारियो का दिल मचले” या गाण्याला फार महत्वाचं मानुन या मुली आपलं आयुष्य जगात असतात. हा- हा तसा प्रवेशास अवघड वर्ग मानवा लागेल, कारण मुळात यातल्या मुलींचे केस लांब असण्याची गरज असते- हो, आणि गंगावन लाऊन इथे प्रवेश निषिद्ध असतो. पण मला खरच कळत नाही... घरातला पंखा लावला तरी कशी यांची बट उडते! म्हणजे काय केसांना anti-gravity non-neutonian फ्लुइड बनवलंय का? निसर्गतः केस उडत नसले, तर स्वतःच फुंकर मारून आपली बट उडवताना या दिसतात. असे फोटो बघितले की मोह आवरत नाही... एकदा खरच करणारे... तोंडापुढे धूर फोटोशॉप करून मागे “कॉलर को थोडासा उपर चढाके” गाणं लाऊन तो व्हिडियो बनवून यांच्या घरी पाठवायचा.. बघू काय होईल ते होईल...(मला लांब केस नाहीत, म्हणून आकाशकंदिलाने काम केलं आहे- त्याचे विशेष आभार).


१४. ह्रिनमुखा: या वर्गातल्या मुलींना खोटं लाजण्याची भयानक खोड असते. म्हणजे, फोटो बघून कळतं हो आम्हाला, की खोटारडेपणा करताय.. उगीचच स्वतःचे बूट(ट च आहे) बघत बसतात...जाऊदे, गैरसमज नको. चपला बघत बसतात. किंवा गालावर हात ठेवून उगाच लाजायचा अभिनय करतात. काही नाही हो, खाली मुंडी अन पातळ धुंडी... आपण न बोललेलंच बर...


असो... तर आमच्या सहनशक्तीत एवढ्याचीच वर्णनं बसतात. आमचे केस लांब नाहीत, त्या मुळे यातल्या काही गोष्टी आम्ही करू शकत नाही... त्यामुळे जाहीर माफी मागतो. मी असले फोटो काढून टाकायचं धाडस करतोय खरं...मला खात्री आहे की काळं कुत्र लाईक करणार नाही.

मुलांनो-- अशा पोरींच कसलं आलंय फुकटचं कौतुक??? कशाला अशा फोटोंना हजार लाईक्स करता? आवरा अरे. त्रेता युगात आणि द्वापार युगात ध्यानस्त ऋषीमुनींना विचलित करायला उर्वशी रंभा मेनका यांना भरतनात्याम वगैरे करायला लागायचं इकडे तुम्ही विचित्र हवभावांना काय बळी पडताय? लायकी वाढवा की जरा. 

मुलींनो- माझे हे फोटो बघून किळस आली असेल, तर तुमचे असले फोटो बघून मला आणि माझ्यासारख्या अनेक विश्वामित्रांनाही तशीच किळस येते. त्यामुळे फोटो टाकताना १००दा विचार करा... आज मी अनेक वर्ष साचलेला वचपा काढून घेतला एकदाचा.

एकूणच पब्लिकला.. असला फालतूपणा सहन करण्यापेक्षा आणि वायरल करण्यापेक्षा चांगल्या गोष्टी तरी शेअर आणि अपलोड करा. 

जाऊदे... झाला माझा आजचा राग व्यक्त करून...
तळटीप: वरील ब्लॉग सर्व मुलींना उद्देशून लिहिलेला नाही. हुशार मुलानी नोंद घ्यावी नोंद घ्यवी आणि वरील प्रकाराला फक्त विनोद मानावे.,
मूर्ख मुलींनी फेमिनिसमच्या नावाखाली माझ्यावर फालतूची टीका करू नये.
-हुकुमावरून(फक्त मूर्ख मुलींसाठी(आणि मुलांसाठी))