Pages

Saturday 15 May 2010

सर्वात मधुर स्वर

बंधनमुक्त होण्याचा जो आनंद असतो, तो निराळाच असतो. कुसुमाग्रजांनी खालील कवितेत त्याचा उत्तम उल्लेख केला आहे.

स्वातंत्र्यासाठी हजारांच्या आकड्यातील क्रांतिकारकांच्या हाता-पायातील साखळदंड तुटल्यावर कुसुमाग्रंजांना हे असेच वाटले असेल का?

                       सर्वात मधुर स्वर

ना मैफिलीतील गाण्याचा, ना पहाडातून झरणाऱ्या पाण्याचा
ना सागराचा, ना कूजनाचा, ना आमंत्रित ओठातील हसण्याचा
सर्वात मधुर स्वर,
कुठेतरी, कोणाच्यातरी मनगटातील शृंखला खळखळा तुटण्याचा.



-कुसुमाग्रज.

1 comment:

  1. Really true...
    seems u are fan of kusumagraj...tyachya kavitancha ullekh tuzya baryach blogs madhye disala..

    ReplyDelete